उंबरे : ऊस उत्पादकांना एकरकमी एफ आर पी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी घटस्थापनेपासून 'जागर एफआरपीचा' हे आ...
उंबरे : ऊस उत्पादकांना एकरकमी एफ आर पी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी घटस्थापनेपासून 'जागर एफआरपीचा' हे आंदोलन आराधना शक्ती स्थळापासून सुरू करणार असून तीर्थयात्रा स्वरूपातील हे आंदोलन 8 ऑक्टोंबर रोजी पंढरपुरात येणार आहे त्यादिवशी मंदिरात विठ्ठलाला साकडे घालण्यात येणार आहे.त्यानंतर तनपुरे महाराज मठात शेतकरी मेळावा होईल. त्यात राजू शेट्टी भूमिका मांडतील व 19 ऑक्टोंबर च्या ऊस परिषदेचे निमंत्रण देतील घटस्थापनेच्या दिवशी आंदोलनास कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर पासून सुरुवात होणार आहे अशी माहिती संघटनेचे युवा आघाडीचे तालुकाप्रमुख अमर इंगळे यांनी दिली. यानंतर संत बाळूमामा आदमापूर, श्री दत्त मंदिर नरसोबावाडी,पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, लातूर ,परळी वैजनाथ ,पैठण, जामखेड, शिर्डी, भीमाशंकर ,दगडूशेठ गणपती पुणे ,जेजुरी अशी यात्रा जाणार आहे. एकरकमी एफ आर पी चा कायदा मोडून तीन टप्प्यात देण्याचा कायदा करण्यात राज्य व केंद्र सरकारने घाट घातला आहे.